अर्थशास्त्र पंचवार्षिक योजना

 पहिली पंचवार्षिक योजना  
(1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956)

  • मुख्य भर - कृषी क्षेत्रावर 
  • प्रतिमान - हेरॉल्ड डोमर 
  • अध्यक्ष - पंडित नेहरु    उपाध्यक्ष - गुलझारीलाल नंदा 
  • योजनेचे उपनाव - पुनरूत्थान योजना 
  • आर्थिक वाढीचा दर  -                                                    संकल्पित - 2.1% साध्य - 3.6%

  •  उद्दिष्टे :-

  1.  दुसर्या महायुद्धामुळे  व भारत फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे. 
  2.  देशातील उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून रोजगार वाढविणे लोकांचा राहणीमान दर्जा उंचावणे. 
  3. अर्थव्यवस्थेतील चलनफुगवटा वर नियंत्रण 

  • हाती घेण्यात आलेली कार्यक्रम

  1. दामोदर खोरे विकास योजना - झारखंड, पश्चिम बंगाल 
  2. भाक्रा नांगल प्रकल्प - हिमांचल प्रदेश, पंजाब (सतलज नदीवर)
  3. कोसी प्रकल्प - (कोसी नदीवर) बिहार 
  4. हीराकुड योजना - महानदीवर - ओडिसा                                 (वरील सर्व प्रकल्प अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित) 
  5. सिंद्री खत कारखाना, झारखंड 
  6. चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना, पश्चिम बंगाल 
  7. पेरंबुर रेल्वे डब्यांचा कारखाना, तामिळनाडू 
  8. एच एम टी, बेंगलोर 
  9. हिंदुस्तान एंटीबायोटिक्स, पिंपरी,  पुणे 
  10. 8 मे 1952 - औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 लागू करण्यात आले 
  11. 2 ऑक्टोंबर 1952 - सामुदायिक विकास कार्यक्रम 
  12. 1952 मध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्ड ची स्थापना 
  13. 1953 अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डची स्थापना 
  14. 1955 एसबीआय ची स्थापना 
  15. 1955 आयसीआयसीआय बँकेची स्थापना

दुसरी पंचवार्षिक योजना
 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 

  • मुख्य भर - जड व मूलभूत उद्योग 
  • प्रतिमान - पी. सी. महालानोबिस 
  • अध्यक्ष - पंडित नेहरू   उपाध्यक्ष - वि टी कृष्णमाचारी 
  • योजनेची उपनाव -  नेहरू-महालनोबीस (भौतिकवादी योजना) 
  • आर्थिक वाढीचा दर -
              संकल्पित - 5%  साध्य - 3.9% 

  • उद्दिष्टे 
  1. विकासाचा दर 7.5% प्रति वर्ष एवढा संपादन करणे. 
  2. जड मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगीकरण करणे. 
  3. 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार. 
  4. समाजवादी समाजरचनेचे तत्व आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून  स्वीकारण्यात आले. 
  • विशेष घटनाक्रम 
  1. दुसरे औद्योगिक धोरण - 30 एप्रिल 1956 
  2. राज्य स्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम -1957-58 
  3. संघन कृषी जिल्हा कार्यक्रम (IADP) - 1960-61 
  • हाती घेण्यात आलेले प्रकल्प 
  1. 1959 - भिलाई पोलाद प्रकल्प - छत्तीसगड (रशियाच्या मदतीने) 
  2. 1959 - रुरकेला पोलाद प्रकल्प - ओडीसा (जर्मनीच्या मदतीने) 
  3. 1962 - दुर्गापूर पोलाद प्रकल्प - पश्चिम बंगाल (ब्रिटनच्या मदतीने)
  4. BHEL(भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) - भोपाळ 
  5. 2 खत कारखाने - 1. नांगल  2.रुरकेला 
  • मूल्यमापन 
  1. पोलाद उद्योगाची विशेष वाढ 
  2. किंमत निर्देशांक 30% वाढला 
  3. खालील प्रश्नांना सामोरे जावे लागले -
    • सुवेझ कालव्याचा प्रश्न 
    • मोसमी पावसाची कमतरता 
    • परकीय चलनसाठ्यात घट

तिसरी पंचवार्षिक योजना 
1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 
  • मुख्य भर - कृषी व मूलभूत उद्योग 
  • प्रतिमान - महालनोबिस (सुखमय चक्रवर्ती) 
  • अध्यक्ष - पंडित नेहरू व शास्त्री     उपाध्यक्ष - त्रिवेदी 
  • आर्थिक वाढीचा दर - संकल्पित 5.6%  साध्य 2.3%

  • उद्दिष्टे -
  1. स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती 
  2. रोजगार निर्मिती 
  3. संधीची समानता 
  • विशेष घटनाक्रम -
  1. 1964 ते 65 मध्ये संघन कृषिक्षेत्र कार्यक्रम (IAAP) 
  2. 1965 मध्ये प्रा. दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. 
  3. 1965 मध्ये भारतीय अन्न महामंडळ(FCI) ची स्थापना 
  4. 1964 मध्ये  IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली. 
  • घडलेल्या घटना 
  1. 1962 चे चीन  युद्ध.
  2. 1965 चे पाकिस्तान युद्ध. 
  3. 1965-66 चा भीषण दुष्काळ. 
  • मूल्यमापन 
  1. आतापर्यंतची सर्वात अपयशी ठरलेली योजना. 
  2. भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले. 
  3. 1966 मध्ये रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवून आणण्यात आले.


योजनेला सुट्टी(Plan Holiday)
 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 

  • नियोजनाच्या सुट्टीचा कालावधी सरकारने तीन वार्षिक योजना राबविल्या.
  • वार्षिक योजनेचा भर - स्वावलंबन 
  1. पहिली वार्षिक योजना (1966-67) 
  • 1966 च्या खरीप हंगामात सरकारने हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. 
  • 6 जून 1966 रोजी रुपयाचे 36.5 घडवून आणण्यात आले.
      2. दुसरी वार्षिक योजना (1967-68) 
  • हरित क्रांतीमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली. 
  • ह्या योजने दरम्यान अन्नधान्याचे चांगले उत्पादन झाले. 
     3. तिसरी वार्षिक योजना (1968-69) 
  • अन्नधान्याचे उत्पादन व किमती स्थिरावल्या. 
  • व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली. 
  • चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली.
#हरितक्रांती 
  • हरितक्रांतीचे जनक - नॉर्मन बोरलॉग 
  • हरितक्रांतीचे भारतीय जनक - एम एस स्वामीनाथन सुब्रमण्यम 
  • महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक 

चौथी पंचवार्षिक योजना 
(1 एप्रिल 1969 ते 21 मार्च 1974 )

  • मुख्य भर - स्वावलंबन 
  • प्रतिमान -  ॲलन मान व अशोक रुद्र 
  • उपनाम - गाडगीळ योजना
  • अध्यक्ष - इंदिरा गांधी       उपाध्यक्ष - धनंजय गाडगीळ 
  • आर्थिक वाढीचा दर - संकल्पित - 5.5% साध्य - 3.3% 
  • घोषवाक्य - स्थैर्यासह आर्थिक वाढ
  • उद्दिष्टे - 
  1. स्वावलंबन
  2. सामाजिक न्यायसह आर्थिक वाढ 
  3. समतोल प्रादेशिक विकास 
  • सुरू करण्यात आलेले कार्यक्रम -
  1. 1972 - बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)
  2. 1973 - SAIL (स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया) 
  3. 1973 - अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (DPAP)
  4. 1974-75 - लघु शेतकरी विकास अभिकरण (SFDA)
  • विशेष घटनाक्रम -
  1. 1969 - आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी 'MRTP ACT 1969' संमत. 
  2. 1969 - 14 बँकांचे राष्ट्रीयकरण. 
  3. 1969 - अग्रणी बँक योजना समिती. 
  4. 1972 - विमा कायदा संमत व 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना. 
  5. 1972-73 - पहिल्यांदा व्यापारतोल अनुकूल
  6. 1973 मध्ये परकीय विनियमय कायदा (FERA) 
  7. 1973-74 मध्ये पहिल्यांदा नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केला. 
  • मूल्यमापन -
  1. पहिला दोन वर्षात चांगली प्रगती मात्र नंतर तीन वर्ष अपयश.
  • कारणे -
  1. 1971 - भारत-पाक युद्ध 
  2. 1973 - पहिला तेलाचा झटका  किमतीत 400 टक्क्यांनी वाढ

पाचवी पंचवार्षिक योजना
1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 
(प्रत्यक्षात चार वर्ष 1974-78) 
  • मुख्य भर - गरिबी हटाव / दारिद्र्य निर्मूलन 
  • प्रतिमान - ॲलन मान व अशोक रुद्र 
  • अध्यक्ष - इंदिरा गांधी        उपाध्यक्ष - धनंजय गाडगीळ 
  • आर्थिक वाढीचा दर -   संकल्प 4.4%    साध्य 5%
  • उद्दिष्टे -
  1. दारिद्रय निर्मूलन 
  2. उत्पादक रोजगारात वाढ 
  • सुरू करण्यात आलेले कार्यक्रम 
  1. ट्रायसेम(TRYSEM) - ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.
  2. किमान गरजांचा कार्यक्रम - दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत सेवा, ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादनक्षमता वाढवणं.
  • विशेष घटनाक्रम 
  1. 2 ऑक्टोंबर 1975 पहिल्या पाच प्रादेशिक ग्रामीण बॅंका स्थापन करण्यात आल्या.
  2. 1976-77 - दुसऱ्यांदा व्यापारतोल अनुकूल.
  3. 1976 - पहिले लोकसंख्या धोरण जाहीर. 
  4. 1975-76 एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली 
  5. 1977 - वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)
  • मूल्यमापन -
  • दारिद्र्य निर्मुलन बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.
  • 25 जून 1975 आणीबाणी जाहीर 
  • 25 जून 1976 वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात 
  • मार्च 1977 जनता पार्टीचे सरकार 
  • मार्च 1978 जनता सरकारने पाचवीला संपुष्ट नाही तर 
  • जनता पार्टीने स्वतःचे योजना ज्याला जनता पार्टीचे योजना किंवा सरकती योजना  म्हणतात



जनता पार्टीची सहावी योजना / सरक्ती योजना 
1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 
  • Rulling Plan ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रो. गुन्नार मिर्डल यांनी दिले जाते.
  • प्रो. गुन्नार मिर्डल यांनी त्यांच्या  "India's Economic Planning In Its Broader Setting" मध्ये सरकती योजनेस वैज्ञानिक रूपात मांडले.
  •  ही योजना प्रोफेसर लकडावाला यांनी तयार केली.
  • योजनेचा भर -
  1.  कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे
  2.  उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगांवर भर 
  • सुरू करण्यात आलेले कार्यक्रम -
  1. फुड फोर वर्क - कामाच्या बदल्यात अन्न
  2. अंत्योदय योजना - देशातील प्रत्येक खेड्यातील गरिबातील गरीब अशा पाच कुटुंबांना सेवा तसेच पैसे पुरविणे. 
  3. जिल्हा उद्योग केंद्र.


सहावी पंचवार्षिक योजना
 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 
  • मुख्य भर - दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती 
  • प्रतिमान - ॲलन मान व अशोक रुद्र 
  • अध्यक्ष - इंदिरा गांधी व राजीव गांधी                      उपाध्यक्ष - दुर्गाप्रसाद धर 
  • आर्थिक वाढीचा दर - संकल्प 5.2% सध्या 5.7% 
  • उद्दिष्ट - 
  1. आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन 
  2. तीन कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती 
  • सुरू करण्यात आलेले कार्यक्रम -
  1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम(IRDP) - प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोंबर 1980 पासून 
  2. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम(NREP) - 2 ऑक्टोंबर 1980 
  3. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना (RLEGP) - 15 ऑगस्ट 1983 
  4. ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास(DWCRA) - सप्टेंबर 1982 डेन्मार्क च्या मदतीने 
  5. नवीन वीस कलमी कार्यक्रम - 14 जानेवारी 1982 
  6. विशाखापटनम पोलाद प्रकल्प, आंध्रप्रदेश व सालेम पोलाद प्रकल्प, तामिळनाडू 
  • विशेष घटनाक्रम -
  1. 15 एप्रिल 1980 - 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण. 
  2. जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक तर जूलै 1982 मध्ये नाबार्ड ची स्थापना. 
  3. योजने दरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
  • मूल्यमापन -
  • योजना यशस्वी ठरली संतुलित विकास व सर्व लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते.





  सातवी पंचवार्षिक योजना  
(1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990)

  • मुख्य भर - उत्पादक रोजगार निर्मिती
  • प्रतिमान - ब्रम्हानंद व वकिल (मजुरी वस्तू प्रतिमान) 
  • अध्यक्ष - राजीव गांधी    उपाध्यक्ष - पी शिवशंकर 
  • घोषवाक्य - अन्न, रोजगार व उत्पादकता
  • घोषणा - बेकारी हटाव 
  • आर्थिक वाढीचा दर  -                                                    संकल्पित - 5% साध्य - 7%

  •  सुरू करण्यात आलेले योजना
  1. इंदिरा आवास योजना - RLEGP चा भाग म्हणून 1985-86 मध्ये सुरू करण्यात आली.
  2. दशलक्ष विहिरीची योजना (1988-89)
  3. पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम - 1986
  4. जवाहर रोजगार योजना - NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण एक एप्रिल 1990 पासून सुरू करण्यात आली.

 वार्षिक योजना  
(1990 - 1992)

  • सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नाही. देशातील राजकीय असतं हे त्यामागील कारण होते. त्याऐवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या. 
  1. 1990-91 
  2. 1991-92

  •  1990-92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण :-

  1.  व्यवहारतोलाचे संकट 
  2. परकीय चलनाचा अत्यल्प साठा 
  3. वाढती राजकोषीय तूट 
  4. चलनवाढीचा मोठा दर 
  5. उद्योग क्षेत्रात मंदी 
  6. 1991 92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढा साध्य झाला.

  • 21 जून 1991 या दिवशी पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार अस्तित्त्वात आले. जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. नवीन सरकारने 1 एप्रिल 1962 रोजी आपल्या आठवी योजना सुरू केली.

 आठवी पंचवार्षिक योजना  
(1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997)

  • मुख्य भर - मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास 
  • प्रतिमान - राम मनमोहन प्रतिमान / LPG प्रतिमान
  • अध्यक्ष - पी व्ही नरसिंहराव    उपाध्यक्ष - मनमोहन सिंग
  • आर्थिक वाढीचा दर  -                                                    संकल्पित - 5.6% साध्य - 6.68%

  •  उद्दिष्टे :-

  1. या शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराची उद्दिष्टे गाठणे.
  2.  प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.
  3. खेड्यात पायाभूत सुविधांचा विकास. 
  4. अन्नधान्य स्वयंपूर्णता. 
  5. उर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचन सुविधा इत्यादी सोयी सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देणे.

  • विशेष घटनाक्रम

  1. 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूक प्रक्रिया सुरू.
  2.  1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय, 1993_94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर 1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन.
  3. 1992 मध्ये सेबीला वैद्यानिक दर्जा. 
  4. 1992 मध्ये 73 व 74 घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा. 
  5. 1993-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँक स्थापन करण्याची संधी.
  • सुरू करण्यात आलेल्या योजना
  1. राष्ट्रीय महिला कोष - 1992 93 
  2. 2 ऑक्टोंबर 1993 रोजी तीन योजना सुरू 
  3. 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू 
  4. 15 ऑगस्ट 1985 रोजी तीन योजना सुरू 
  5. संगम योजना - 15 ऑगस्ट 1996 
  6. गंगा कल्याण योजना - 1 फेब्रुवारी 1997
  • योजना जवळजवळ सर्व क्षेत्रात यशस्वी ठरली.

नववी पंचवार्षिक योजना  
(1 एप्रिल 1997 ते  मार्च 2002)

  • मुख्य भर - कृषी व ग्रामीण विकास 
  • प्रतिमान - अमृत सेन
  • अध्यक्ष - इंद्रकुमार गुजराल 1997 98 व अटल बिहारी वाजपायी 1998 नंतर    
  • उपाध्यक्ष - मधु दंडवते जसवंत सिंग व के सी पंत
  • आर्थिक वाढीचा दर  -                                                    संकल्पित - 6.5% साध्य - 5.5%

  •  उद्दिष्टे :-

  1. कृषी व ग्रामीण विकास यांना अग्रक्रम. 
  2. सर्वांना मूलभूत किमान सेवा करणे. 
  3. शाश्वत विकास. 
  4. स्त्रिया अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय इ. सबलीकरण. 
  5. लोकांचा सहभाग वाढू शकणार्या संस्थांचा विकासास चालना. उदाहरणार्थ पंचायतराज संस्था, सहकारी संस्था.

  • विशेष घटनाक्रम

  1. एप्रिल 1997 मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित. 
  2. 1998 मध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्वकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले.
  3. फेब्रुवारी 2008 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित.
  4. 2000-01 या वर्षी आयात निर्यात धोरणात सर्वप्रथम विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना मांडण्यात आली. 
  5. एप्रिल 2000 पासून CENVAT ची, तर जून 2000 पासून FEMA ची अंमलबजावणी सुरू झाली.
  • सुरू करण्यात आलेल्या योजना
  1. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना डिसेंबर 1997 
  2. अन्नपूर्णा योजना 1999 
  3. स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1999 
  4. समग्र आवास योजना 1999 
  5. जवाहर ग्राम समृद्धी योजना 
  6. अंत्योदया अन्न  योजना 25 डिसेंबर 2000 
  7. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 
  8. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000 01 
  9. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 
  10. वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001 
  11. सर्व शिक्षा अभियान 2001



































या ब्लॉगचे व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युबवर Maharashtra Warriors सर्च करा./click here.















Comments

Popular posts from this blog

इतिहास महत्त्वाचे समाजसुधारक

संघराज्य व राज्यक्षेत्र