अर्थशास्त्र पंचवार्षिक योजना
पहिली पंचवार्षिक योजना
(1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956)
- मुख्य भर - कृषी क्षेत्रावर
- प्रतिमान - हेरॉल्ड डोमर
- अध्यक्ष - पंडित नेहरु उपाध्यक्ष - गुलझारीलाल नंदा
- योजनेचे उपनाव - पुनरूत्थान योजना
- आर्थिक वाढीचा दर - संकल्पित - 2.1% साध्य - 3.6%
- उद्दिष्टे :-
- दुसर्या महायुद्धामुळे व भारत फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे.
- देशातील उपलब्ध साधन सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून रोजगार वाढविणे लोकांचा राहणीमान दर्जा उंचावणे.
- अर्थव्यवस्थेतील चलनफुगवटा वर नियंत्रण
- हाती घेण्यात आलेली कार्यक्रम
- दामोदर खोरे विकास योजना - झारखंड, पश्चिम बंगाल
- भाक्रा नांगल प्रकल्प - हिमांचल प्रदेश, पंजाब (सतलज नदीवर)
- कोसी प्रकल्प - (कोसी नदीवर) बिहार
- हीराकुड योजना - महानदीवर - ओडिसा (वरील सर्व प्रकल्प अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या धर्तीवर आधारित)
- सिंद्री खत कारखाना, झारखंड
- चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना, पश्चिम बंगाल
- पेरंबुर रेल्वे डब्यांचा कारखाना, तामिळनाडू
- एच एम टी, बेंगलोर
- हिंदुस्तान एंटीबायोटिक्स, पिंपरी, पुणे
- 8 मे 1952 - औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 लागू करण्यात आले
- 2 ऑक्टोंबर 1952 - सामुदायिक विकास कार्यक्रम
- 1952 मध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्ड ची स्थापना
- 1953 अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डची स्थापना
- 1955 एसबीआय ची स्थापना
- 1955 आयसीआयसीआय बँकेची स्थापना
दुसरी पंचवार्षिक योजना
1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961
- मुख्य भर - जड व मूलभूत उद्योग
- प्रतिमान - पी. सी. महालानोबिस
- अध्यक्ष - पंडित नेहरू उपाध्यक्ष - वि टी कृष्णमाचारी
- योजनेची उपनाव - नेहरू-महालनोबीस (भौतिकवादी योजना)
- आर्थिक वाढीचा दर -
- उद्दिष्टे
- विकासाचा दर 7.5% प्रति वर्ष एवढा संपादन करणे.
- जड मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगीकरण करणे.
- 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार.
- समाजवादी समाजरचनेचे तत्व आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले.
- विशेष घटनाक्रम
- दुसरे औद्योगिक धोरण - 30 एप्रिल 1956
- राज्य स्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रम -1957-58
- संघन कृषी जिल्हा कार्यक्रम (IADP) - 1960-61
- हाती घेण्यात आलेले प्रकल्प
- 1959 - भिलाई पोलाद प्रकल्प - छत्तीसगड (रशियाच्या मदतीने)
- 1959 - रुरकेला पोलाद प्रकल्प - ओडीसा (जर्मनीच्या मदतीने)
- 1962 - दुर्गापूर पोलाद प्रकल्प - पश्चिम बंगाल (ब्रिटनच्या मदतीने)
- BHEL(भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) - भोपाळ
- 2 खत कारखाने - 1. नांगल 2.रुरकेला
- मूल्यमापन
- पोलाद उद्योगाची विशेष वाढ
- किंमत निर्देशांक 30% वाढला
- खालील प्रश्नांना सामोरे जावे लागले -
- सुवेझ कालव्याचा प्रश्न
- मोसमी पावसाची कमतरता
- परकीय चलनसाठ्यात घट
तिसरी पंचवार्षिक योजना
1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
- मुख्य भर - कृषी व मूलभूत उद्योग
- प्रतिमान - महालनोबिस (सुखमय चक्रवर्ती)
- अध्यक्ष - पंडित नेहरू व शास्त्री उपाध्यक्ष - त्रिवेदी
- आर्थिक वाढीचा दर - संकल्पित 5.6% साध्य 2.3%
- उद्दिष्टे -
- स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती
- रोजगार निर्मिती
- संधीची समानता
- विशेष घटनाक्रम -
- 1964 ते 65 मध्ये संघन कृषिक्षेत्र कार्यक्रम (IAAP)
- 1965 मध्ये प्रा. दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.
- 1965 मध्ये भारतीय अन्न महामंडळ(FCI) ची स्थापना
- 1964 मध्ये IDBI व UTI ची स्थापना करण्यात आली.
- घडलेल्या घटना
- 1962 चे चीन युद्ध.
- 1965 चे पाकिस्तान युद्ध.
- 1965-66 चा भीषण दुष्काळ.
- मूल्यमापन
- आतापर्यंतची सर्वात अपयशी ठरलेली योजना.
- भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली भारताला मदतीसाठी IMF कडे जावे लागले.
- 1966 मध्ये रुपयाचे 36.5% अवमूल्यन घडवून आणण्यात आले.
योजनेला सुट्टी(Plan Holiday)
1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969
- नियोजनाच्या सुट्टीचा कालावधी सरकारने तीन वार्षिक योजना राबविल्या.
- वार्षिक योजनेचा भर - स्वावलंबन
- पहिली वार्षिक योजना (1966-67)
- 1966 च्या खरीप हंगामात सरकारने हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला.
- 6 जून 1966 रोजी रुपयाचे 36.5 घडवून आणण्यात आले.
- हरित क्रांतीमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली.
- ह्या योजने दरम्यान अन्नधान्याचे चांगले उत्पादन झाले.
3. तिसरी वार्षिक योजना (1968-69)
- अन्नधान्याचे उत्पादन व किमती स्थिरावल्या.
- व्यवहारतोलाची परिस्थिती सुधारली.
- चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली.
#हरितक्रांती
- हरितक्रांतीचे जनक - नॉर्मन बोरलॉग
- हरितक्रांतीचे भारतीय जनक - एम एस स्वामीनाथन सुब्रमण्यम
- महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक - वसंतराव नाईक
चौथी पंचवार्षिक योजना
(1 एप्रिल 1969 ते 21 मार्च 1974 )
- मुख्य भर - स्वावलंबन
- प्रतिमान - ॲलन मान व अशोक रुद्र
- उपनाम - गाडगीळ योजना
- अध्यक्ष - इंदिरा गांधी उपाध्यक्ष - धनंजय गाडगीळ
- आर्थिक वाढीचा दर - संकल्पित - 5.5% साध्य - 3.3%
- घोषवाक्य - स्थैर्यासह आर्थिक वाढ
- उद्दिष्टे -
- स्वावलंबन
- सामाजिक न्यायसह आर्थिक वाढ
- समतोल प्रादेशिक विकास
- सुरू करण्यात आलेले कार्यक्रम -
- 1972 - बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)
- 1973 - SAIL (स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया)
- 1973 - अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (DPAP)
- 1974-75 - लघु शेतकरी विकास अभिकरण (SFDA)
- विशेष घटनाक्रम -
- 1969 - आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी 'MRTP ACT 1969' संमत.
- 1969 - 14 बँकांचे राष्ट्रीयकरण.
- 1969 - अग्रणी बँक योजना समिती.
- 1972 - विमा कायदा संमत व 1 जानेवारी 1973 रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना.
- 1972-73 - पहिल्यांदा व्यापारतोल अनुकूल
- 1973 मध्ये परकीय विनियमय कायदा (FERA)
- 1973-74 मध्ये पहिल्यांदा नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केला.
- मूल्यमापन -
- पहिला दोन वर्षात चांगली प्रगती मात्र नंतर तीन वर्ष अपयश.
- कारणे -
- 1971 - भारत-पाक युद्ध
- 1973 - पहिला तेलाचा झटका किमतीत 400 टक्क्यांनी वाढ
पाचवी पंचवार्षिक योजना
1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979 (प्रत्यक्षात चार वर्ष 1974-78)
- मुख्य भर - गरिबी हटाव / दारिद्र्य निर्मूलन
- प्रतिमान - ॲलन मान व अशोक रुद्र
- अध्यक्ष - इंदिरा गांधी उपाध्यक्ष - धनंजय गाडगीळ
- आर्थिक वाढीचा दर - संकल्प 4.4% साध्य 5%
- उद्दिष्टे -
- दारिद्रय निर्मूलन
- उत्पादक रोजगारात वाढ
- सुरू करण्यात आलेले कार्यक्रम
- ट्रायसेम(TRYSEM) - ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम.
- किमान गरजांचा कार्यक्रम - दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत सेवा, ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादनक्षमता वाढवणं.
- विशेष घटनाक्रम
- 2 ऑक्टोंबर 1975 पहिल्या पाच प्रादेशिक ग्रामीण बॅंका स्थापन करण्यात आल्या.
- 1976-77 - दुसऱ्यांदा व्यापारतोल अनुकूल.
- 1976 - पहिले लोकसंख्या धोरण जाहीर.
- 1975-76 एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) सुरू करण्यात आली
- 1977 - वाळवंट विकास कार्यक्रम (DDP)
- मूल्यमापन -
- दारिद्र्य निर्मुलन बेरोजगारी आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये अपयश.
- 25 जून 1975 आणीबाणी जाहीर
- 25 जून 1976 वीस कलमी कार्यक्रमाची सुरुवात
- मार्च 1977 जनता पार्टीचे सरकार
- मार्च 1978 जनता सरकारने पाचवीला संपुष्ट नाही तर
- जनता पार्टीने स्वतःचे योजना ज्याला जनता पार्टीचे योजना किंवा सरकती योजना म्हणतात
जनता पार्टीची सहावी योजना / सरक्ती योजना
1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980
- Rulling Plan ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रो. गुन्नार मिर्डल यांनी दिले जाते.
- प्रो. गुन्नार मिर्डल यांनी त्यांच्या "India's Economic Planning In Its Broader Setting" मध्ये सरकती योजनेस वैज्ञानिक रूपात मांडले.
- ही योजना प्रोफेसर लकडावाला यांनी तयार केली.
- योजनेचा भर -
- कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे
- उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगांवर भर
- सुरू करण्यात आलेले कार्यक्रम -
- फुड फोर वर्क - कामाच्या बदल्यात अन्न
- अंत्योदय योजना - देशातील प्रत्येक खेड्यातील गरिबातील गरीब अशा पाच कुटुंबांना सेवा तसेच पैसे पुरविणे.
- जिल्हा उद्योग केंद्र.
सहावी पंचवार्षिक योजना
1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
- मुख्य भर - दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती
- प्रतिमान - ॲलन मान व अशोक रुद्र
- अध्यक्ष - इंदिरा गांधी व राजीव गांधी उपाध्यक्ष - दुर्गाप्रसाद धर
- आर्थिक वाढीचा दर - संकल्प 5.2% सध्या 5.7%
- उद्दिष्ट -
- आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन
- तीन कोटी 40 लक्ष लोकांसाठी रोजगार निर्मिती
- सुरू करण्यात आलेले कार्यक्रम -
- एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम(IRDP) - प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोंबर 1980 पासून
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम(NREP) - 2 ऑक्टोंबर 1980
- ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना (RLEGP) - 15 ऑगस्ट 1983
- ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास(DWCRA) - सप्टेंबर 1982 डेन्मार्क च्या मदतीने
- नवीन वीस कलमी कार्यक्रम - 14 जानेवारी 1982
- विशाखापटनम पोलाद प्रकल्प, आंध्रप्रदेश व सालेम पोलाद प्रकल्प, तामिळनाडू
- विशेष घटनाक्रम -
- 15 एप्रिल 1980 - 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण.
- जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक तर जूलै 1982 मध्ये नाबार्ड ची स्थापना.
- योजने दरम्यान देशास अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले.
- मूल्यमापन -
- योजना यशस्वी ठरली संतुलित विकास व सर्व लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना सर्वाधिक यशस्वी मानली जाते.
सातवी पंचवार्षिक योजना
(1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990)
- मुख्य भर - उत्पादक रोजगार निर्मिती
- प्रतिमान - ब्रम्हानंद व वकिल (मजुरी वस्तू प्रतिमान)
- अध्यक्ष - राजीव गांधी उपाध्यक्ष - पी शिवशंकर
- घोषवाक्य - अन्न, रोजगार व उत्पादकता
- घोषणा - बेकारी हटाव
- आर्थिक वाढीचा दर - संकल्पित - 5% साध्य - 7%
- सुरू करण्यात आलेले योजना
- इंदिरा आवास योजना - RLEGP चा भाग म्हणून 1985-86 मध्ये सुरू करण्यात आली.
- दशलक्ष विहिरीची योजना (1988-89)
- पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम - 1986
- जवाहर रोजगार योजना - NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण एक एप्रिल 1990 पासून सुरू करण्यात आली.
वार्षिक योजना
(1990 - 1992)
- सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नाही. देशातील राजकीय असतं हे त्यामागील कारण होते. त्याऐवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.
- 1990-91
- 1991-92
- 1990-92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण :-
- व्यवहारतोलाचे संकट
- परकीय चलनाचा अत्यल्प साठा
- वाढती राजकोषीय तूट
- चलनवाढीचा मोठा दर
- उद्योग क्षेत्रात मंदी
- 1991 92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढा साध्य झाला.
- 21 जून 1991 या दिवशी पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार अस्तित्त्वात आले. जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. नवीन सरकारने 1 एप्रिल 1962 रोजी आपल्या आठवी योजना सुरू केली.
आठवी पंचवार्षिक योजना
(1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997)
- मुख्य भर - मानवी विकास किंवा मनुष्यबळ विकास
- प्रतिमान - राम मनमोहन प्रतिमान / LPG प्रतिमान
- अध्यक्ष - पी व्ही नरसिंहराव उपाध्यक्ष - मनमोहन सिंग
- आर्थिक वाढीचा दर - संकल्पित - 5.6% साध्य - 6.68%
- उद्दिष्टे :-
- या शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराची उद्दिष्टे गाठणे.
- प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.
- खेड्यात पायाभूत सुविधांचा विकास.
- अन्नधान्य स्वयंपूर्णता.
- उर्जा, वाहतूक, दळणवळण, सिंचन सुविधा इत्यादी सोयी सुविधा वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून देणे.
- विशेष घटनाक्रम
- 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणूक प्रक्रिया सुरू.
- 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय, 1993_94 मध्ये व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय, तर 1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तन.
- 1992 मध्ये सेबीला वैद्यानिक दर्जा.
- 1992 मध्ये 73 व 74 घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संविधानिक दर्जा.
- 1993-94 मध्ये खाजगी क्षेत्रात पुन्हा बँक स्थापन करण्याची संधी.
- सुरू करण्यात आलेल्या योजना
- राष्ट्रीय महिला कोष - 1992 93
- 2 ऑक्टोंबर 1993 रोजी तीन योजना सुरू
- 23 डिसेंबर 1993 रोजी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना सुरू
- 15 ऑगस्ट 1985 रोजी तीन योजना सुरू
- संगम योजना - 15 ऑगस्ट 1996
- गंगा कल्याण योजना - 1 फेब्रुवारी 1997
- योजना जवळजवळ सर्व क्षेत्रात यशस्वी ठरली.
नववी पंचवार्षिक योजना
(1 एप्रिल 1997 ते मार्च 2002)
- मुख्य भर - कृषी व ग्रामीण विकास
- प्रतिमान - अमृत सेन
- अध्यक्ष - इंद्रकुमार गुजराल 1997 98 व अटल बिहारी वाजपायी 1998 नंतर
- उपाध्यक्ष - मधु दंडवते जसवंत सिंग व के सी पंत
- आर्थिक वाढीचा दर - संकल्पित - 6.5% साध्य - 5.5%
- उद्दिष्टे :-
- कृषी व ग्रामीण विकास यांना अग्रक्रम.
- सर्वांना मूलभूत किमान सेवा करणे.
- शाश्वत विकास.
- स्त्रिया अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय इ. सबलीकरण.
- लोकांचा सहभाग वाढू शकणार्या संस्थांचा विकासास चालना. उदाहरणार्थ पंचायतराज संस्था, सहकारी संस्था.
- विशेष घटनाक्रम
- एप्रिल 1997 मध्ये भारताचे दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित.
- 1998 मध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात महत्वकांक्षी योजना राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले.
- फेब्रुवारी 2008 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित.
- 2000-01 या वर्षी आयात निर्यात धोरणात सर्वप्रथम विशेष आर्थिक क्षेत्राची संकल्पना मांडण्यात आली.
- एप्रिल 2000 पासून CENVAT ची, तर जून 2000 पासून FEMA ची अंमलबजावणी सुरू झाली.
- सुरू करण्यात आलेल्या योजना
- स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना डिसेंबर 1997
- अन्नपूर्णा योजना 1999
- स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1999
- समग्र आवास योजना 1999
- जवाहर ग्राम समृद्धी योजना
- अंत्योदया अन्न योजना 25 डिसेंबर 2000
- प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000
- प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000 01
- संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001
- वाल्मिकी आंबेडकर आवास योजना सप्टेंबर 2001
- सर्व शिक्षा अभियान 2001
Comments
Post a Comment